Manipur News : मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा अखेर राजीनामा

Share

नवी दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडे बिरेन सिंग यांनी राजीनामा सोपवला. राजीनामा देण्याअगोदर त्यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीवेळी यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रादेखील होते.

गेल्या वर्षी ३ मे रोजी मणिपूरमधील मैतेई समुदाय आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाला. मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध भारतीय आदिवासी विद्यार्थी संघाने एका रॅलीचे आयोजन केले होते. अनुसूचित जमातीच्या यादीत मणिपुरी समुदायाचा समावेश करण्याचा विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरूच आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला निमलष्करी दल तैनात करावे लागले होते. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट मोडवर गेले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल मणिपूर वासियांची माफीदेखील मागितली होती. राज्यपालांना सुपूर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यात एन. बिरेन सिंह म्हणाले आहे की, मी मणिपूरी व्यक्तीच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाबद्दल आभारी आहे. सरकारने वेगवेगळ्या विकास कामांना गती दिली आणि विविध योजना लागू केल्या. एन. बिरेन सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण मदत आणि मार्गदर्शनामुळे मणिपूरच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

39 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

44 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago