माघी पौर्णिमेच्या पर्वासाठी महाकुंभमध्ये भाविकांचा ‘महापूर’

प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगा


नवी दिल्ली : प्रयागराज येथे महाकुंभसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेक भाविका शाही स्नानासाठी देशभरातून येथे पोहचत आहेत. उत्तरप्रदेशमधील अनेक शहरातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्यप्रदेशातील खूप शहरातही स्टेशन व बसस्टँडवरही भक्तांचे लोढें लोंढे येत आहेत. गर्दीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. वाराणसी, मिर्जापूर, लखनऊ, यासह ७ एंट्री पॉईंटवर वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी या रांगा २० किलोमीटर पर्यंत पोहचल्या होत्या. अनेक लोक तर रस्त्यावरील ट्रॅफिक जॅममध्येच अडकले आहेत. ट्रेनची अवस्थाही अशीच आहे. एसी, नॉन एसी, जनरल डबे लोकांच्या गर्दीने तुडूंब भरले आहेत.


१२ फेब्रूवारी रोजी माघी पौर्णिमा आहे. यादिवशी शाही स्नान होणार आहे. त्रिवेणी संगमात स्नान करुन पुण्य कमवण्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराजला येत आहेत. यामुळे प्रयागराजकडे येणारे सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. संगमावर पोहचण्यासाठी लोकांची होड लागली आहे. यासाठी छोटा हत्ती सारख्या टेम्पोचा वापर केला जातो. यामध्ये १० लोक बसू शकतात पण आता यात २०-२० लोक कोंबले जात आहेत. प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सर्व रस्त्यांवर ट्रॅफिक जाम लागले आहेत. रीवा येथे १० किलोमीटर, मध्य प्रदेश व उत्तरप्रदेश बॉर्डरवर अनेक रस्ते वाहनांनी खचाखच भरले आहे. जबलपूर मध्ये ४० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर सिहोरा येथे ११ किलोमीटर ट्रॅफिक जॅम लागला आहे.



सामान्य रेल्वे प्रवाशांना फटका


दिल्ली हावडा या रेल्वे मार्ग नेहमीच व्यस्त असतो. हजारोंच्या संख्येने या मार्गावरुन प्रवासी ये- जा करत असतात. आता यामध्ये भाविकांची भर पडली आहे त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वेत चढ- उतार करणे तर जिकीरीचे बनले आहे. अनेकांच्या रेल्वेसुद्धा चूकत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याला जाणारे भाविक सोडून इतर प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसत आहे. ३०-३० किलोमीटर चालत काही प्रवाशी प्रयागराजला पोहचले आहेत.


५ हजारांवर वाहने अडकली


रिवा शहरात कार आणि बसेसला युपी सरकारने थांबवल्या आहेत. त्यामुळे रिवा, सतना, जिल्ह्यामध्ये ५ हजारांवर गाड्या अडकल्या आहेत. अनेकांकडे खाण्याचे साहित्य आहे पण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हाल होत आहेत. याचा फायदा स्थानिक दुकानदार उठवत आहेत. चढ्या भावाने वस्तूंची विक्री होत आहे.


१३५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १० तास


वाहनांची एवढी प्रचंड गर्दी झाली आहे की रिवा शहरातून प्रयागराज हे १३५ किलोमिटर अंतर पार करण्यासाठी ८ ते १० तास लागत आहे. मंगवा, कटरा, चाकघाट, सुहागी, जसरा या प्रयागराजच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत.

Comments
Add Comment

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान

Apple Event 2026 : ॲपलचा भारतात महाधमाका! आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली 'MacBook Pro 2026' लाँच; कधी सुरु होणार प्री ऑर्डर ?

मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे

PM Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ओमान, कतारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,