समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

  95

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग या देशातील सर्वाधिक लांबीच्या द्रुतगती मार्गावर २१ ठिकाणी फूडकोर्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचा निर्णय झाला आहे. वे-साइड ॲमिनिटीज श्रेणीतील या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.



समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. पण रस्ता लवकर सुरू करण्याला प्राधान्य दिल्यामुळे या महामार्गावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. यामुळे सलग अनेक तास प्रवास केल्याने रस्ते संमोहन होऊन अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे. यामुळे अपघात टळण्याची आशा आहे.



समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी (दोन्ही बाजूंना १०-१०) अशा सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. यात चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून सुविधा उभारल्या जातील. फूड कोर्ट अर्थात खाण्या-पिण्याची सोय आणि निवडक स्वच्छतागृह तातडीने करण्याचे नियोजन आहे. महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा काढली आहे. निविदेनुसार मुंबई ते नागपूर मार्गावर १० आणि नागपूर ते मुंबई मार्गावर ११ ठिकाणी स्वच्छतागृह उभारायची आहेत.

नागपूर दिशेकडील वायफळ (नागपूर), गुंदेवाडी व मानकापूर (वर्धा), दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), दवाळा (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) यांचा समावेश आहे. तर मुंबई दिशेने वायफळ (नागपूर), गणेशपूर (वर्धा), शिवनी (अमरावती), ताथोड अखतवाडा व दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), कडवांची (जालना), पोखरी व अनंतपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण केली जाणार आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.