समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग या देशातील सर्वाधिक लांबीच्या द्रुतगती मार्गावर २१ ठिकाणी फूडकोर्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचा निर्णय झाला आहे. वे-साइड ॲमिनिटीज श्रेणीतील या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.



समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. पण रस्ता लवकर सुरू करण्याला प्राधान्य दिल्यामुळे या महामार्गावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. यामुळे सलग अनेक तास प्रवास केल्याने रस्ते संमोहन होऊन अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे. यामुळे अपघात टळण्याची आशा आहे.



समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी (दोन्ही बाजूंना १०-१०) अशा सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. यात चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून सुविधा उभारल्या जातील. फूड कोर्ट अर्थात खाण्या-पिण्याची सोय आणि निवडक स्वच्छतागृह तातडीने करण्याचे नियोजन आहे. महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा काढली आहे. निविदेनुसार मुंबई ते नागपूर मार्गावर १० आणि नागपूर ते मुंबई मार्गावर ११ ठिकाणी स्वच्छतागृह उभारायची आहेत.

नागपूर दिशेकडील वायफळ (नागपूर), गुंदेवाडी व मानकापूर (वर्धा), दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), दवाळा (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) यांचा समावेश आहे. तर मुंबई दिशेने वायफळ (नागपूर), गणेशपूर (वर्धा), शिवनी (अमरावती), ताथोड अखतवाडा व दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), कडवांची (जालना), पोखरी व अनंतपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण केली जाणार आहे.
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील