Mexico : मेक्सिकोत ट्रक-बसच्या धडकेत बसला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू

मेक्सिको : दक्षिण मेक्सिकोमध्ये रस्ते ट्रकची बसला जोरात धडक लागून भीषण अपघात घडला. या धडकेत बसला आग लागली. या आगीत तब्बल ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.ही दुर्घटना शनिवारी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ४८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका ट्रकला धडकली. बस कॅनकुनहून तबास्कोला येत होती. या अपघातात बसमधील ३८ प्रवासी आणि दोन चालकांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. ट्रक चालकाचाही यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात स्पष्ट दिसून येतंय कि टक्कर झाल्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि पूर्णपणे जळून खाक झाली.


 




आग विझवल्यानंतर, फक्त बसच्या चौकटीचे अवशेष शिल्लक राहिले. आतापर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.तसेच या अपघातग्रस्त बसमधून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी १८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मात्र मृतदेह ओळखण्यापलिकडे गेले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या संचालक कंपनीने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात कसा झाला आणि अपघात झाला तेव्हा बस वेगमर्यादेमध्ये होती का? याचा तपास अधिकाऱ्यांसोबत मिळून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Comments
Add Comment

India Population : अधिक मुले जन्माला घाला, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; पण वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार नवे प्रश्न

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे