Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले 'इतके' दिवस!

अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शोधा घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे. यासाठी पुरवठा विभागाने पुन्हा मुदतवाढ केली आहे.



अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या अवधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.



का केली जाते ई-केवायसी ?


शिधापत्रिक आधार क्रमांकासह संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा अधार क्रमांक अचूक आणि तोच आहे, याची पडताळणी (सत्यापन) या प्रक्रियेद्वारे केली जाते. ओळख व पत्ता यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया महत्त्वाची आहे.



शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे सत्यापण


शिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीचे सत्यापण होणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील.



३३ टक्के शिधापत्रिकाधारकांनी फिरविली पाठ


रेशन दुकानात ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधार कार्ड व शिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरीही लाभार्थ्यांद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे.


महिन्याचे धान्यदेखील मिळणार नाही

प्रधान्य गट लाभार्थी - १५,१२,१३०

ई-केवायसी बाकी - ६,७५,३७७

अंत्योदय लाभार्थी - ४,७८,५४८

प्राधान्य गट कार्ड - ३,७४,३३५

अंत्योदय - १,२८,२०७

ई-केवायसी बाकी तालुकानिहाय लाभार्थी


अचलपूर ७६,४५६, तहसील ४०,१५३, मोर्शी ३६,३६३, अंजनगाव ३५,७०२, भातकुली २८,७९७, चांदूररेल्वे १७,२२४, चांदूरबाजार ६१,३३०, चिखलदरा ३४,९३८, दर्यापूर ३१,६६४, धामणगाव रेल्वे २८,७३६, धारणी ५९,३९९, नांदगाव खंडेश्वर १८,३३३, तिवसा २८,१५२, वरुड ४२,६४२ व अमरावती एफडीओमध्ये १,३५६,४८३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण