मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मागेल त्याला पाणी यानुसार सर्वांसाठी पाणी धोरण जाहीर केले. या निर्णयानुसार महापालिकेत निवासी जागांना जलजोडण्या देण्यासाठी आतापर्यंत १५,३७५ जलजोडण्यांना महापालिकेच्य जलअभियंता विभागाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण ७८६८ जलजोडण्यात देण्यात आल्या आहेत.



मुंबई महापालिकेने सर्व निवासी जागांना जलजोडण्या देण्याच्या हेतून जून २०२२ पासून सर्वांसाठी पाणी या सर्वसामावेश धोरणांची अंमलबजावणी सुरु केली. त्यामुळे जून २०२२ पासून १९९५ आणि त्यानंतरच्या झोपडपट्ट्या, अनधिकृत बिगर झोपडपट्टी बांधकामे आणि गावठाण तसेच कोळीवाड्यतील रहिवाशांना पाणी पुरवठा मंजूर करण्यासाठी हे धोरण मंजूर केले होते. भारताच्या राज्यघटनेतील कलम २१ मधील तरतुदींनुसार प्रत्येक नागरिकाला चांगले अन्न, शुद्ध पाणी व हवा मिळणे हा मूलभूत हक्क असल्याने मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व निवासी जागांना, घरांना व झोपड्यांना जल जोडणी देण्याबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या हेतूने नवीन धोरण तयार करण्यात आले आहे.



मुंबई महापालिकेने मागेल त्याला पाणी पुरवठा करण्याचे धोरण बनवत महापालिका व राज्य सरकारच्या व्यतिरिक्त इतर जागांवर वसलेल्या झोपडपट्टयांसह ओसी नसलेल्या इमारतींना पाणी पुरवठा करण्याचे धोरण जाहीर केले होते. या धोरणाला १० जानेवारी २०१७ रोजी महापालिकेने मंजुरी दिली होती. पंरतु त्यामध्ये केंद्र सरकार व इतर जमिनींवरील झोपड्यांचा तसेच त्या जागांवरील ओसी नसलेल्या इमारतींना समान धोरणानुसार पाणी पुरवठा करण्याच्या उल्लेख नसल्याने अनेकांना याच लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे धोरण मंजूर होऊनही सुधारीत धोरण बनवून याची अंमलबजावणी व्हायला जून २०२२ उजाडले.



या धोरणाच्या प्रत्यक्ष अमंलबजावणीनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत महापालिकेकडे जलजोडणीसाठी ११,३७३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैंकी महापालिकेने मागील वर्षी ९,९०१ जलजोडणींना परवानगी दिली होती आणि त्यातील ४,१७९ एवढया जलजोडण्या दिल्या होत्या.

तर डिसेंबर २०२४ पर्यंत महापालिकेने १५,३७५ जलजोडण्यांना परवानी दिल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे. त्यापैंकी आतापर्यंत एकूण् ७,८६८ नवीन जलजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरात महापालिकेने ३,६८९ जलजोडण्यात दिल्या आहेत, मागील वर्षी ४,१७९ जलजोडण्यात दिल्या होत्या असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक