Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले 'इतके' दिवस!

  152

अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शोधा घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे. यासाठी पुरवठा विभागाने पुन्हा मुदतवाढ केली आहे.



अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या अवधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.



का केली जाते ई-केवायसी ?


शिधापत्रिक आधार क्रमांकासह संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा अधार क्रमांक अचूक आणि तोच आहे, याची पडताळणी (सत्यापन) या प्रक्रियेद्वारे केली जाते. ओळख व पत्ता यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया महत्त्वाची आहे.



शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे सत्यापण


शिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीचे सत्यापण होणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील.



३३ टक्के शिधापत्रिकाधारकांनी फिरविली पाठ


रेशन दुकानात ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधार कार्ड व शिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरीही लाभार्थ्यांद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे.


महिन्याचे धान्यदेखील मिळणार नाही

प्रधान्य गट लाभार्थी - १५,१२,१३०

ई-केवायसी बाकी - ६,७५,३७७

अंत्योदय लाभार्थी - ४,७८,५४८

प्राधान्य गट कार्ड - ३,७४,३३५

अंत्योदय - १,२८,२०७

ई-केवायसी बाकी तालुकानिहाय लाभार्थी


अचलपूर ७६,४५६, तहसील ४०,१५३, मोर्शी ३६,३६३, अंजनगाव ३५,७०२, भातकुली २८,७९७, चांदूररेल्वे १७,२२४, चांदूरबाजार ६१,३३०, चिखलदरा ३४,९३८, दर्यापूर ३१,६६४, धामणगाव रेल्वे २८,७३६, धारणी ५९,३९९, नांदगाव खंडेश्वर १८,३३३, तिवसा २८,१५२, वरुड ४२,६४२ व अमरावती एफडीओमध्ये १,३५६,४८३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ