India vs England: दुसऱ्या वनडेत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी

रोहितचं शतक, गिलचं अर्धशतक


कटक: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज खेळला गेला. हा सामना भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून जिंकला. भारताने ४४.३ षटकांत ३०८ धावा करत सहा गडी गमावले. यासह या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ही गोलंदाजीत ३ गडी बाद करत महत्त्वाची भूमिका बजावली. यासह भारताने सलग सातव्यांदा मालिका विजय नोंदवला.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज, रविवारी कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

रोहितने पहिल्या चेंडूपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ७६ चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील शतकही पूर्ण केलं. रोहितने या डावात ९० चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ११९ धावांची खेळी केली. तर त्याला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि १ षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या.

शुभमन गिल ६० धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर मोठी जबाबदारी होती. मात्र विराट अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माची जोडी जमली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाकडे विजयश्री खेचून आणण्यात मोलाची भर टाकली. श्रेयस ४४ धावांवर धाव बाद होऊन माघारी परतला. शेवटी अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला आणि भारताला विजय मिळवून दिला.

आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड