समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग या देशातील सर्वाधिक लांबीच्या द्रुतगती मार्गावर २१ ठिकाणी फूडकोर्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचा निर्णय झाला आहे. वे-साइड ॲमिनिटीज श्रेणीतील या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.



समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. पण रस्ता लवकर सुरू करण्याला प्राधान्य दिल्यामुळे या महामार्गावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. यामुळे सलग अनेक तास प्रवास केल्याने रस्ते संमोहन होऊन अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे. यामुळे अपघात टळण्याची आशा आहे.



समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी (दोन्ही बाजूंना १०-१०) अशा सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. यात चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून सुविधा उभारल्या जातील. फूड कोर्ट अर्थात खाण्या-पिण्याची सोय आणि निवडक स्वच्छतागृह तातडीने करण्याचे नियोजन आहे. महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा काढली आहे. निविदेनुसार मुंबई ते नागपूर मार्गावर १० आणि नागपूर ते मुंबई मार्गावर ११ ठिकाणी स्वच्छतागृह उभारायची आहेत.

नागपूर दिशेकडील वायफळ (नागपूर), गुंदेवाडी व मानकापूर (वर्धा), दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), दवाळा (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) यांचा समावेश आहे. तर मुंबई दिशेने वायफळ (नागपूर), गणेशपूर (वर्धा), शिवनी (अमरावती), ताथोड अखतवाडा व दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), कडवांची (जालना), पोखरी व अनंतपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण केली जाणार आहे.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा