गौतम अदानींनी मुलाचं लग्न साधेपणानं करुन केलं कोट्यवधींचं दान

अहमदाबाद : अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुलाचा विवाह साधेपणाने केला. मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान करुन साजरा केला. जीत गौतम अदानी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी कोट्यवधींचं दान केल्याचं जाहीर केलं. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी अदानींनी दान केलं.





समाजातील सर्व घटकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालये, शिक्षणसंस्था, प्रशिक्षण संस्था यांना गौतम अदानी यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं.



मुलगा जीत आणि दिवा हे दोघे अहमदाबादमधील अदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये शुक्रवारी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी विवाहबद्ध झाले. विवाह गुजराती पद्धतीने झाला. साधेपणाने पण सर्व परंपरागत धार्मिक विधी करुन विवाह करण्यात आला. याप्रसंगी मोजके नातलग उपस्थित होते. जीतच्या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदानी यांनी 'मंगल सेवा' या समाजसेवी उपक्रमाची घोषणा केली. त्याद्वारे पाचशे विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे.



विवाहाच्या निमित्ताने जीत यांनी २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांनाही अर्थसहाय्य दिले. जीत अदानी हे अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आहेत. या कंपनीतर्फे मुंबईसह सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.
Comments
Add Comment

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough