Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची सरशी होत असतानाच आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ३१३८ मतांनी पराभव केलाय.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गेल्या ५ फेब्रुवारी रोजी १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर एकूण ६०.५४ टक्के मतदान झाले होते. नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या ८ फेऱ्यांनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्‍या १३ फैर्‍यांपैकी दहाव्‍या फेरीत केजरीवाल हे १८४४ मतांनी पिछाडीवर राहिले. अखेर मतमोजणीच्‍या तेराव्‍या फेरीनंतर ३१३८ मतांनी प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्‍ली मतदारसंघात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शीला दीक्षित पराभव केला होता. यानंतर त्‍यांनी ३ वेळा या विधानसभा मतदारसंघातचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्‍हणजे या मतदारसंघात दिवगंत माजी मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही निवडणूक लढवली होती. केजरीवालांच्‍या पराभवात संदीप यांचेही योगदान राहिले. ते स्‍वत: पराभूत झाले असले तरी केजरीवालांना धक्‍का दिल्‍याचे समाधान त्‍यांना लाभले आहे.

Recent Posts

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

46 seconds ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

38 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

1 hour ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

2 hours ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

7 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago