Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची सरशी होत असतानाच आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ३१३८ मतांनी पराभव केलाय.


दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गेल्या ५ फेब्रुवारी रोजी १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर एकूण ६०.५४ टक्के मतदान झाले होते. नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या ८ फेऱ्यांनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्‍या १३ फैर्‍यांपैकी दहाव्‍या फेरीत केजरीवाल हे १८४४ मतांनी पिछाडीवर राहिले. अखेर मतमोजणीच्‍या तेराव्‍या फेरीनंतर ३१३८ मतांनी प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.



अरविंद केजरीवाल यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्‍ली मतदारसंघात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शीला दीक्षित पराभव केला होता. यानंतर त्‍यांनी ३ वेळा या विधानसभा मतदारसंघातचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्‍हणजे या मतदारसंघात दिवगंत माजी मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही निवडणूक लढवली होती. केजरीवालांच्‍या पराभवात संदीप यांचेही योगदान राहिले. ते स्‍वत: पराभूत झाले असले तरी केजरीवालांना धक्‍का दिल्‍याचे समाधान त्‍यांना लाभले आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव