Amit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आपवर टीका


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) आम आदमी पक्षाचा (AAP) मोठा पराभव झाला असून, भाजपाने (BJP) ५० जागांवर विजय मिळवत राजधानीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आम आदमी पक्षाने केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचा किल्ला सर केला. या विजयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.



शाह यांचा ‘आप’वर हल्लाबोल


अमित शाह यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराच्या विरोधात दिलेला कौल स्पष्ट असल्याचे म्हटले.





त्यांनी म्हटले आहे की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेने खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ (Sheesh Mahal) उद्ध्वस्त करत आप-दा मुक्त दिल्ली केली आहे. ज्या लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा लोकांना दिल्लीकरांनी धडा शिकवला."



दिल्ली आता विकासाच्या नव्या पर्वात – शाह


शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला असून, अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विकासाचा व्हिजन दिल्लीत दाखवला आहे आणि त्यावर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. या प्रचंड जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार."


मोदींच्या नेतृत्वातील भाजपाने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला आहे, असे शाह म्हणाले.



दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलणार?


या निकालानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत भाजपा आणि आपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच