Amit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आपवर टीका


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) आम आदमी पक्षाचा (AAP) मोठा पराभव झाला असून, भाजपाने (BJP) ५० जागांवर विजय मिळवत राजधानीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आम आदमी पक्षाने केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचा किल्ला सर केला. या विजयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.



शाह यांचा ‘आप’वर हल्लाबोल


अमित शाह यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराच्या विरोधात दिलेला कौल स्पष्ट असल्याचे म्हटले.





त्यांनी म्हटले आहे की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेने खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ (Sheesh Mahal) उद्ध्वस्त करत आप-दा मुक्त दिल्ली केली आहे. ज्या लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा लोकांना दिल्लीकरांनी धडा शिकवला."



दिल्ली आता विकासाच्या नव्या पर्वात – शाह


शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला असून, अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विकासाचा व्हिजन दिल्लीत दाखवला आहे आणि त्यावर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. या प्रचंड जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार."


मोदींच्या नेतृत्वातील भाजपाने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला आहे, असे शाह म्हणाले.



दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलणार?


या निकालानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत भाजपा आणि आपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा