Amit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आपवर टीका


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) आम आदमी पक्षाचा (AAP) मोठा पराभव झाला असून, भाजपाने (BJP) ५० जागांवर विजय मिळवत राजधानीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आम आदमी पक्षाने केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचा किल्ला सर केला. या विजयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.



शाह यांचा ‘आप’वर हल्लाबोल


अमित शाह यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराच्या विरोधात दिलेला कौल स्पष्ट असल्याचे म्हटले.





त्यांनी म्हटले आहे की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेने खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ (Sheesh Mahal) उद्ध्वस्त करत आप-दा मुक्त दिल्ली केली आहे. ज्या लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा लोकांना दिल्लीकरांनी धडा शिकवला."



दिल्ली आता विकासाच्या नव्या पर्वात – शाह


शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला असून, अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विकासाचा व्हिजन दिल्लीत दाखवला आहे आणि त्यावर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. या प्रचंड जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार."


मोदींच्या नेतृत्वातील भाजपाने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला आहे, असे शाह म्हणाले.



दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलणार?


या निकालानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत भाजपा आणि आपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक