Water Shortage : अलिबागकरांवर पाणीटंचाई! ४७ गावांतील नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

अलिबाग : अलिबाग येथील उमटे धरणातून (Alibaug Umte Dam) मिळणाऱ्या पाण्यातून ४७ गावांतील लाखो नागरिकांची तहान भागवली जाते.  या धरणातील पाण्यावर तालुक्यातील गावे अवलंबून आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी डिसेंबर महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यात येते. मात्र यंदा ही पाणीकपात फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंत अलिबागकरांवर पाणीटंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरण बांधून ४७ वर्षे झाली असून, धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागले आहे.


दरम्यान, गाळ काढण्याकडे राजिपचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेकापच्या माध्यमातून आणि राजिपच्या परवानगीने या धरणातील काहीअंशी गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने हे गाळ काढणे थांबले गेले. मात्र धरणात पाणी असल्याने गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. (Water Shortage)


उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, पावसाळा येईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात ५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील गाळ मार्च महिन्यापासून पाणी पातळी कमी झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात