SSC HSC Exam : विद्यार्थ्यांनो सावधान! परीक्षेत कॉपी कराल थेट तुरुंगात जाल

मुंबई : दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा (SSC HSC Exam) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षा सुरु होताच यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांकडून कॉपीचे प्रकरण समोर येते. प्रशासनाने कॉपीमुक्त राज्य करण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही परीक्षेत कॉपी केल्याचे आढळून येत आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानुसार, परीक्षांमध्ये कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.



हॉल तिकीट विसरल्यासही परीक्षेला परवानगी


परीक्षेसाठी विद्यार्थी हॉल तिकीट विसरल्यास घाबरण्याचे कारण नाही असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉल तिकीट नसल्यानाही विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. पुढील दिवशी मात्र हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षेसाठी वेशभूषेवर कोणतेही बंधन नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. (SSC HSC Exam)

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा