गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता, पाच वर्षांनंतर RBI चा व्याजदर कपातीचा निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो दरात व्याजदर कपात मे २०२० मध्ये केली होती. यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात व्याजदर कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकांकडून मिळणारी गृहकर्ज, वाहनकर्ज आदी प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.



रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. यामुळे रेपो दर (रेपो रेट) ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकारने नव्या करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले. या घोषणेला काही दिवस होत नाहीत तोच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. या लागोपाठच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक उलाढालींना चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.



देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील आणि घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला.
Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे