वनडे सामना जिंकूनही खुश दिसला नाही कर्णधार रोहित शर्मा,म्हणाला...

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी नागपूरमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट राखत विजय मिळवला.


या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करत २४९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३३ षटकांत ३ विकेट गमावत २२० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने ५.४ षटकांत ३१ धावा करण्यासाठी ३ विकेट गमावल्या.


सामना जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, सामन्यात सगळं काही चांगलं होतं. मात्र शेवटी सामना जिंकण्याच्या जवळ असताना इतके विकेट गमावले हे होता कामा नये.


सामन्यात २ धावा करणाऱ्या रोहितने म्हटले, एक टीम म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी योग्य करायच्या होत्या. मला वाटते की प्रत्येकाने योग्य बॉक्स टिक करावा. बॅटिंग असो वा बॉलिंग सगळ्यांनी योग्य करा. दरम्यान,सामन्याच्या शेवटी शेवटी आम्ही ज्या विकेट गमावल्या त्या गमावल्या नाही पाहिजे होत्या.

Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर

यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!

नवी दिल्ली  : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना

टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३