वनडे सामना जिंकूनही खुश दिसला नाही कर्णधार रोहित शर्मा,म्हणाला...

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी नागपूरमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट राखत विजय मिळवला.


या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करत २४९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३३ षटकांत ३ विकेट गमावत २२० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने ५.४ षटकांत ३१ धावा करण्यासाठी ३ विकेट गमावल्या.


सामना जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, सामन्यात सगळं काही चांगलं होतं. मात्र शेवटी सामना जिंकण्याच्या जवळ असताना इतके विकेट गमावले हे होता कामा नये.


सामन्यात २ धावा करणाऱ्या रोहितने म्हटले, एक टीम म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी योग्य करायच्या होत्या. मला वाटते की प्रत्येकाने योग्य बॉक्स टिक करावा. बॅटिंग असो वा बॉलिंग सगळ्यांनी योग्य करा. दरम्यान,सामन्याच्या शेवटी शेवटी आम्ही ज्या विकेट गमावल्या त्या गमावल्या नाही पाहिजे होत्या.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील