Pune - Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; बसची कंटेनरला धडक

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात आज (दि. ७, शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडला असून आळेफाटा येथे खासगी बस कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




५० ते ६० प्रवाशांना घेऊन खासगी बस पुण्याहून नाशिकच्या दिशेनं निघाली होती. आळेफाटा येथे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि बस समोरच्या कंटेनरला धडकली. या अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून जीवित हानी झालेली नाही. पोलिसांनी या अपघाताची दखल घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे.

Comments
Add Comment

Jejuri Accdent : जेजुरी दुर्घटनेनंतर वारीत आणखी एक अपघात; अहिल्यानगरात भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले

पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत

Political News : शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि

Ketan Agrawal Murder : 'माझ्या मुलाला न्याय द्या', पुणे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान

शेतकरी कर्जमाफी योजनेत आणखी २३ लाख शेतकरी पात्र, निकषांत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; नियमित कर्ज परतफेडीची अटही शिथिल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक संपन्न ! शेतकऱ्यांपासून ते परिवहन मंडळापर्यंत सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

Cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ जुलै) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक

Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक