जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार; रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्ताराचे काम सुरू आहे. हे काम आणखी काही दिवस चालणार असल्यामुळे मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जनशताब्दी आणि मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तेजस एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. फलाट विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि मध्य-कोकण रेल्वेच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. त्यांना लांब पल्ल्याच्या गाडीतून उतरुन लोकल अथवा इतर पर्यायाचा वापर करुन पुढे प्रवास करावा लागणार आहे.



सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस फलाटांची लांबी २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवण्याच्या दृष्टीने वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. निधी उपलब्ध झाल्यावर मध्य रेल्वेने हे काम सुरू केले असून सध्या विस्तारीकरण अंतिम टप्यात आहे. काम सुरू असल्यामुळे निवडक गाड्यांसाठी सध्या फलाट उपलब्ध नाही. फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे काही मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.



  1. १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत

  2. १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत

  3. २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून