जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार; रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्ताराचे काम सुरू आहे. हे काम आणखी काही दिवस चालणार असल्यामुळे मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जनशताब्दी आणि मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तेजस एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. फलाट विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि मध्य-कोकण रेल्वेच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. त्यांना लांब पल्ल्याच्या गाडीतून उतरुन लोकल अथवा इतर पर्यायाचा वापर करुन पुढे प्रवास करावा लागणार आहे.



सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस फलाटांची लांबी २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवण्याच्या दृष्टीने वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. निधी उपलब्ध झाल्यावर मध्य रेल्वेने हे काम सुरू केले असून सध्या विस्तारीकरण अंतिम टप्यात आहे. काम सुरू असल्यामुळे निवडक गाड्यांसाठी सध्या फलाट उपलब्ध नाही. फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे काही मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.



  1. १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत

  2. १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत

  3. २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील