उद्योगपती अनिल अंबानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. बीड जिल्ह्यातील दौरा आटोपून मुख्यमंत्री बुधवारी रात्री मुंबईत परतले. यानंतर अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अनिल अंबानींसोबतच्या भेटीआधी आणि भेटीनंतर निवडक सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत निती आयोगाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील नवीन उद्योगांची रुपरेषा, अनेक महत्त्वाचे प्रकल्प, रखडलेले प्रकल्प मार्गी कसे लावता येतील याबाबत चर्चा झाली. या बैठकीचा आणि अनिल अंबानींच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल अंबानी आणि फडणवीस यांच्या भेटीचे कारण अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. पण या भेटीला महत्त्व आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतरची ही अनिल अंबानींची त्यांच्यासोबतची पहिलीच बैठक आहे. लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस अलिकडेच दाओसच्या दौऱ्यावरुन आले आहेत. या दौऱ्यात झालेल्या भेटीगाठींचा आणि अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा काही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य