India vs England: पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर सहज विजय

गिल, अय्यर आणि अक्षरची जबरदस्त अर्धशतकी खेळी


नागपूर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षऱ पटेल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजयासाठी मिळालेले २४९ धावांचे आव्हान ४ विकेट आणि ६८ बॉल राखत पूर्ण केले.


भारताच्या या विजयात गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनी महत्त्वाची भागीदारी केली. आधी गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी तीन विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. त्यांनी इंग्लंडला २४८ धावांवर रोखले.


इंग्लंडकडून सलाीमीवीर फिल सॉल्टने ४३ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ५२ धावा करत संघाला अडीचशेच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न केला. त्याला जॅकॉब बेथेलनेही चांगली साथ दिली. त्याने ५१ धावांची खेळी केली.


इंग्लंडच्या डावानंतर भारताने खेळायला सुरूवात केली. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. १९ धावसंख्या असताना यशस्वी जायसवाल बाद झाला. त्यानंतर लगेचच रोहित शर्मा बाद झाला. रोहितला केवळ २ धावाच करता आल्या. रोहितची बॅट अद्याप धावा काढण्याच्या प्रतीक्षेत आहे.


दोन सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला शंभरीपार नेले. श्रेयस अय्यर ३६ बॉलमध्ये ५९ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिल अक्षर पटेलच्या साथीने खेळू लागला. अक्षरनेही ५२ धावांची खेळी करत भारताला विजय सहज करून दिला. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या शुभमन गिलने ८७ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने हा सामना जिंकला.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय