Ind Vs Eng : कटकमध्ये भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी

भुवनेश्वर : भारत वि इंग्लंड वनडे मालिका भारतात उद्यापासून (६ फेब्रुवारी) खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये तर दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. कटकमध्ये खेळवला जाणारा सामना पाहण्यासाठी कटक स्टेडियमबाहेर ऑफलाइन तिकिट खरेदीसाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती. यामुळे चेंजराचेंगरी झाली आहे.या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आल्याची तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


कटक, ओडिशातील बाराबती स्टेडियमबाहेर मंगळवारी रात्रीपासूनच क्रिकेट चाहत्यांनी गोंधळ घातला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे ऑफलाइन तिकीट काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी झपाट्याने उफाळून आली. तिकीट उपलब्ध असल्याची माहिती पसरताच, परिस्थिती आणखी बिघडली. काही लोक गर्दीच्या तिकीट काउंटरमध्ये धडपड करत होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.या सर्व प्रकारामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रचंड गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जसह पाण्याच्या तोफांचा अवलंब करावा लागला.या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आली तर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.



स्थानिकांनी कटक येथील प्रशासनावर चुकीचे नियोजन आणि अपुऱ्या सुविधांमुळे अशी घटना घडल्याचा आरोप केला. निराश चाहत्यांनी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि जाण्यायेण्याचा योग्य मार्ग तयार केले नसल्याची टीका केली, ज्यामुळे तणाव वाढल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली.तिकीट विक्री नीट न झाल्याने अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशनवर टीका केली.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अनेक वर्षांनंतर कटकमध्ये खेळवला जाणार आहे. बाराबती स्टेडियमवरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामना होता. त्याचवेळी, विराट कोहली आणि रोहित शर्मा बाराबती स्टेडियमवर खेळण्याची ही गेल्या पाच वर्षांतील पहिलीच वेळ आहे. या दोन स्टार खेळाडूंनी शेवटचा एकदिवसीय सामना २०१९ मध्ये कटक येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता, जेव्हा कोहलीला भारताच्या विजयाचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू