संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने केली आत्महत्या

देहू : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष महाराजांच्या पार्थिवावर देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.



शिरीष महाराज यांचे लग्न ठरले होते. टिळ्याचा कार्यक्रम झाला होता. यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावरुन चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी आणि मोरे कुटुंबाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.





शिरीष महाराजांची कृती देहूकरांसाठी आणि मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस तपासात सत्य कळेल; असे मोरे कुटुंबातील सदस्य म्हणाले.

ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी करणे टाळा; असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी काही काळापूर्वी केले होते.
Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत