संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने केली आत्महत्या

देहू : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष महाराजांच्या पार्थिवावर देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.



शिरीष महाराज यांचे लग्न ठरले होते. टिळ्याचा कार्यक्रम झाला होता. यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावरुन चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी आणि मोरे कुटुंबाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.





शिरीष महाराजांची कृती देहूकरांसाठी आणि मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस तपासात सत्य कळेल; असे मोरे कुटुंबातील सदस्य म्हणाले.

ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी करणे टाळा; असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी काही काळापूर्वी केले होते.
Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून