संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने केली आत्महत्या

देहू : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष महाराजांच्या पार्थिवावर देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.



शिरीष महाराज यांचे लग्न ठरले होते. टिळ्याचा कार्यक्रम झाला होता. यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावरुन चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी आणि मोरे कुटुंबाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.





शिरीष महाराजांची कृती देहूकरांसाठी आणि मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस तपासात सत्य कळेल; असे मोरे कुटुंबातील सदस्य म्हणाले.

ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी करणे टाळा; असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी काही काळापूर्वी केले होते.
Comments
Add Comment

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली