भारत - बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे ७९ टक्के काम पूर्ण

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारत - बांगलादेश सीमेची एकूण लांबी ४०९६.७ किलोमीटर आहे. यापैकी ३२३२.२१८ किलोमीटर क्षेत्रावर कुंपण घालण्यात आले आहे. अद्याप ८६४.४८२ किलोमीटर लांबीचे कुंपण घालायचे असून यामध्ये १७४.५१४ किलोमीटर लांबीच्या अव्यवहार्य टप्प्याचा समावेश आहे.



कुंपण घालताना भू संपादन, बॉर्डर गार्ड बांगलादेशने घेतलेल्या हरकती आणि आक्षेप, कामासाठी आवश्यक मर्यादीत हंगाम आणि भूस्खलन/दलदलीच्या जमिनीशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे कुंपण घालण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. पण देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कुंपण आवश्यक आहे. याच कारणामुळे भारत सरकारने भारत - बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले आहे. सीमांचे रक्षण करण्याकरता सीमेलगत कुंपण घालणे हा एक अतिशय महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. कुंपण घालण्यामुळे सीमेवरील गुन्हेगारी कारवाया, तस्करी, गुन्हेगारांचा संचार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या सगळ्याला आळा घालण्यास मदत होणार आहे.



आंतरराष्ट्रीय सीमेबाबतच्या नियमांचे पालन करत कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. भारताच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी कुंपण घातले जात आहे. नियोजनानुसार हे काम केले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. कुंपण घालण्याचे काम सुरू असताना भारताचे सीमा सुरक्षा दल (Border Security Force or BSF) हे बांगलादेशच्या बीजीबीच्या (Border Guard Bangladesh or BGB) संपर्कात आहे. समन्वय राखून काम केले जात आहे; असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले.
Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम