AI App : “एआय-ऍपचा वापर टाळा”- केंद्रीय अर्थमंत्रालय

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांनी चॅट-जीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय-ऍपचा वापर टाळावा. यामुळे सरकारच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्रालयाने २९ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन संगणक आणि मोबाईलमध्‍ये चॅट-जीपीटी व डीपसीक अशा प्रकराच्‍या एआय-ऍपचा वापर करु नये. अशा प्रकारचे ऍपच्या वापरामुळे सरकारची महत्त्‍वपूर्ण आणि गोपनीय माहिती उघड होण्‍याचा धोका आहे. त्‍यामुळे चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळावा.


अशा प्रकराच्‍या चॅटबॉट्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ही अधिसूचना २९ जानेवारी जारी केली आहे. मात्र तब्‍बल एक आवठड्यानंतर ही सूचना चर्चेत आली आहे. कारण ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारताच्या दौऱ्यावर येत असून ते केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे.



चीनचे अल्‍पावधीत लोकप्रिय झालेल्‍या डीपसीकवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या स्वतःच्या पायाभूत मॉडेलसह जागतिक एआय स्‍पर्धेत उतरणार असल्‍याचे सूतोवाच केले होते. भारतात बनवलेले फाउंडेशनल मॉडेल्स जगातील सर्वोत्तम मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतील.अल्गोरिथमिक कार्यक्षमतेसह आपण हे मॉडेल्स खूपच कमी वेळेत तयार करू शकतो. आपल्याकडे काही महिन्यांतच जागतिक दर्जाचे फाउंडेशनल एआय मॉडेल असेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता.

Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर