Anganwadi Bharti : १२वी पास अन् सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात कामासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.



शिक्षण आणि वयोमर्यादा


महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.


या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून १८ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषद/नगर पंचायत / नगर पालिका / नगर पंचायत / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त