Anganwadi Bharti : १२वी पास अन् सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात कामासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

शिक्षण आणि वयोमर्यादा

महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून १८ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषद/नगर पंचायत / नगर पालिका / नगर पंचायत / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

14 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

30 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

45 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

54 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago