बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यात एकूण २८ दिवसांमध्ये १४ दिवस सुट्टया असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील. फेब्रुवारी महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात स्थानिक नियम, सणउत्सवानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो.


३ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. ११ फेब्रुवारीला थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील. १२ फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. १५ फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई नगाई-नोच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवानी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूर मधील बँका बंद असतील.


२० फेब्रुवारी रोजी गुरुवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथेो बैंका बंद असतील. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैद्राबाद (आंध प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी असतील. २८ फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे