बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यात एकूण २८ दिवसांमध्ये १४ दिवस सुट्टया असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील. फेब्रुवारी महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात स्थानिक नियम, सणउत्सवानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो.


३ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. ११ फेब्रुवारीला थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील. १२ फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. १५ फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई नगाई-नोच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवानी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूर मधील बँका बंद असतील.


२० फेब्रुवारी रोजी गुरुवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथेो बैंका बंद असतील. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैद्राबाद (आंध प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी असतील. २८ फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव