Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाड्या सुसाट; ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी पुणे विभागातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि जवळपासच्या रेल्वे स्थानकांसाठी प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १४४ वर्षांतून येणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.



जानेवारी महिन्यात तर दोन शाही स्नानांची तिथी होती. त्यामुळे पुण्यातून बहुसंख्य नागरिक उत्तर प्रदेशातील प्रयागराजकडे निघाले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रेल्वेच्या गाड्या अजूनही फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना ऑनलाईन तिकिटे सध्या उपलब्धच होत नाहीत. यामुळे प्रवासी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. असे असले तरी रेल्वेच्या पुणे विभागाकडून भाविकांसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्यांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच गाड्यांद्वारे रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी २०२५ महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात