Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाड्या सुसाट; ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी पुणे विभागातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि जवळपासच्या रेल्वे स्थानकांसाठी प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १४४ वर्षांतून येणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.



जानेवारी महिन्यात तर दोन शाही स्नानांची तिथी होती. त्यामुळे पुण्यातून बहुसंख्य नागरिक उत्तर प्रदेशातील प्रयागराजकडे निघाले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रेल्वेच्या गाड्या अजूनही फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना ऑनलाईन तिकिटे सध्या उपलब्धच होत नाहीत. यामुळे प्रवासी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. असे असले तरी रेल्वेच्या पुणे विभागाकडून भाविकांसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्यांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच गाड्यांद्वारे रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी २०२५ महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये