Maharashtra Kusti 2025 : शिवराज राक्षेच्या वादात चंद्रहार पाटीलची उडी; दोन्ही गदा परत करण्याचा घेतला निर्णय

सांगली : यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. या लढतीदरम्यान झालेल्या राड्यावेळी शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली. या कृत्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.


या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. अशातच चंद्रहार पाटील याने त्याला मिळालेल्या दोन्ही गदा परत करण्याचा निर्णय घेतला आहे.



काय म्हणाला चंद्रहार पाटील ?


एका व्हिडिओमध्ये बोलताना चंद्रहार पाटील म्हणाला, एका डिबेट कार्यक्रमामध्ये काका पवार, संदीप भोंडवे आणि शिवराज राक्षे होते, यावेळी २००९ ला माझा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व पंच कमिटीने पराभव केला याबद्दल काका पवारांना विचारल्यावर त्यांनी मान्य केलं की चंद्रहारवर अन्याय झाला. शिवराज राक्षे हा त्यांचा पठ्ठा, त्याच्यावर अन्याय झाला की ते माध्यमांना सांगत आहेत. पण जेव्हा माझ्या बाबतीत हे घडत असताना तुम्ही तिथं हजर होते. शरद पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मला हरवल्यानंतर मी आत्महत्येच्या विचारत होतो. आजही मी कोणत्या कुस्तीच्या मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसली आहे.



एखाद्या पैलवानाची अशी परिस्थिती का होते? शिवराज राक्षेवर ही परिस्थिती आल्यावर काका पवारांना यांचं दु:ख कळालं. आज त्यांनी मान्य केलं की माझ्यावर अन्याय झाला होता. तशाच पद्धतीने त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावं की चंद्रहारवर अन्याय झाला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आलं. म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल नाहीतर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदांची गरज नाही. मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून माताची सेवा करून या पदापर्यंत पोहोचलो होतो. अन्याय होऊन मी एखाद्या विशिष्ट विचारापर्यंत गेलो होतो. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार.


दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यातून कसा बाहेर पडणार आणि शिवराज राक्षेला न्याय मिळणार का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.