रजनीकांतच्या ’कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आत्महत्या

अमली पदार्थ प्रकरणात केली होती अटक


पणजी : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलगु चित्रपट निर्माता के. पी. चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी याने गोव्यात आत्महत्या केली आहे. के. पी चौधरी याला २०२३ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याने गोव्यात आत्महत्या करत आपले जीवन संपवले.


के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माता असून त्याने मेगास्टार रजनीकांत यांच्या ’कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्याला हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.


टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्याच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात गुंतला. यातील कमाईतून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता.



यानंतर चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होता व येथेच त्याने क्लब देखील सुरु केला. पण या व्यवसायात देखिल तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होता. या घटनेनंतर चौधरी खचला होता. शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.


के. पी. चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे