रजनीकांतच्या ’कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आत्महत्या

  45

अमली पदार्थ प्रकरणात केली होती अटक


पणजी : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलगु चित्रपट निर्माता के. पी. चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी याने गोव्यात आत्महत्या केली आहे. के. पी चौधरी याला २०२३ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याने गोव्यात आत्महत्या करत आपले जीवन संपवले.


के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माता असून त्याने मेगास्टार रजनीकांत यांच्या ’कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्याला हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.


टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्याच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात गुंतला. यातील कमाईतून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता.



यानंतर चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होता व येथेच त्याने क्लब देखील सुरु केला. पण या व्यवसायात देखिल तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होता. या घटनेनंतर चौधरी खचला होता. शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.


के. पी. चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन