Rupee at 87 : डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८७ वर

  135

नवी दिल्ली : जागतिक घडामोडी विशेषतः अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. परिणामी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांवर पोहोचला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला आहे. कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.


मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. रुपया ८७ रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी डाॅलरच्या तुलनेत रुपया ८६.६१ वर बंद झाला होता. मात्र, आज तब्बल ८७ प्रति डाॅलरवर रुपया पोहोचला.



अमेरिकेच्या सुधारीत आर्थिक परिस्थितीत अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाली आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेतील उच्च उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांसाठी अमेरिका आकर्षक ठरत आहे. अमेरिकेत नव्या सरकारच्या धोरणांबाबत अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे. सोबतच, जगातील भूराजकीय तणावांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता कायम, ज्यात रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्व संकट, लाल समुद्रातील शिपिंगसारख्या समस्यांमुळे देखील रुपया घसरला आहे.


परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भांडवली बाजारातून हात आखडता घेतला आहे. कमकुवत रुपयामुळे आयात बिलात वाढ, कारण आयातदार डॉलरमध्ये पैसे देतात. खाद्यतेल, डाळी, खते, तेल आणि गॅस यांच्या आयातीचा खर्च वाढतो. भारताचे कच्च्या तेलाची आयात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेल आणि गॅसच्या आयातीवर मोठे परिणाम होणार आहेत. रुपया कमकुवत होणे म्हणजेच महाग आयात ज्याचे परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )