कुंभमेळ्यावरून परतत असताना अपघात, रत्नागिरीतील तीन जणांचा मृत्यू

नाशिक: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. मात्र याच कुंभमेळ्यावरून परतत असताना नाशिकमध्ये काही भाविकांवर काळाने घाला घातला.


नाशिकच्या सिन्नरमध्ये कुंभमेळ्यावरून परतत असणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात रत्नागिरीतील तीन जणांचा मृत्यू झालाय. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत.


रत्नागिरीतील हे भाविक प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. यावेळी समृद्धी महामार्गावरून ते रत्नागिरीच्या दिशेने परतत होते. यावेळेस नाशिकच्या जवळ पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती पुढच्या गाडीवर जाऊन आदळली.


या अपघातात रत्नागिरीतील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, अथर्व किरण निकम आणि चालक भाग्यवान झगडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर किरण निकम , रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज आणि प्रांजल प्रकाश साळवी हे जखमी झाले. जखमींपैकी किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय.

Comments
Add Comment

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :