Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या ७५ मिनिटांच्या भाषणातून मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा एक अनोखा विक्रम आहे. याआधी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मात्र त्यांनी वेगवेगळ्या कार्यकाळांमध्ये अर्थसंकल्प सादर केले आहेत.


२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएनं विजय मिळवला. त्यावेळी सीतारामन पहिल्यांदा अर्थमंत्री झाल्या. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्या वर्षीसाठी पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सीतारामन सलग अर्थसंकल्प सादर करत आलेल्या आहेत. मोदी ३.० सरकारमधला हा त्यांचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे.



गेल्यावर्षी १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर केलेला सर्वात कमी कालावधीचा अर्थसंकल्प फक्त ५७ मिनिटे चालला. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७५ मिनिटे अर्थसंकल्पात सादर केला. या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.