स्वयंपाक करताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी थोडक्यात वाचली

  144

नाशिक : नाशिक शहरातील अंबड परिसरात असलेल्या चुंचाळे परिसरातील एक गृहिणी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच जोरात फुटल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गॅस शेगडीवरील काच फुटल्यामुळे मोठा हादरा झाला.


याबाबत अधिक माहिती अशी की चुंचाळे परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सरोदे संकुलातील रुम नंबर येथे रहाणारे इक्बाल पिंजारी यांनी सन गेल्या दोन वर्षांपुर्वी कामटवाडे शिवारातील कोमल टॉवर येथे असलेल्या नाकोडा होम अप्लायन्स येथुन प्रेस्टीज कंपनीची ५ हजार १०० रुपये किंमतीची गॅस शेगडी विकत घेतली आहे इक्बाल पिंजारी यांची पत्नी आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना गॅस शेगडीवर असलेली काच अचानक फुटली यावेळी स्वयंपाक घरातील पोळीच्या पिठासह भाजी तसेच संपुर्ण घरात काचेचे तुकडे उडले होते.


गॅस शेगडीवरील काच फुटल्याने मोठा आवाज झाला आणि त्या जागेवर धूरही पसरला. मात्र, यावेळी गृहिणीने चपळाई दाखवत स्वत:चा बचाव केला आणि किचनमधून सुरक्षितपणे बाहेर पडली.हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. काही नागरिकांनी सुरक्षिततेसाठी गॅस लाइन बंद केली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे .


गॅस शेगडीवरील काच फुटण्याची ही घटना स्वयंपाकघरातील सुरक्षिततेची महत्त्वाची आठवण करून देते. गॅस शेगडीच्या सुरक्षिततेचे पालन करणे, काचेच्या भागांची नियमित तपासणी करणे, तसेच गॅस वापरण्याची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ञांनी दिली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे नागरिकांना गॅस वापराबाबत अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी