Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा


नागपुर : वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. वाढदिवस साजरा करायला प्रत्येकाला आवडतोच. लहान मुलांसाठी वाढदिवस साजरा करणं ही एक पर्वणी असते. वाढदिवस साजरा नाही झाला तर लहान मुले रुसून बसतात. नागपुरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करायला विरोध केल्याने १० वर्षाच्या मुलाने घर सोडले आहे.




नागपूरात वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांनी वाढदिवस साजरा करायला नकार दिल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात घर सोडल्यानंतर मुलगा घरी दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरु केली. मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पथकाला मुलगा परिसरातील स्वामी नारायण मंदिरात सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी स्वतः केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला.

Comments
Add Comment

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील