इंग्लंडविरुद्ध भारताचा १५ धावांनी विजय, मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने १५ धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.


भारताने इंग्लंडला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडचा डाव १६६ धावांवर आटोपला. इंग्लंडचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून हर्षिित राणा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत इंग्लंडच्या संघाला खिंडार लावले.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी बोलावले. भारताने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर १८२ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले आहे.

सुरूवातीच्या फलंदाजांपैकी सलामीवीर अभिषेक शर्माने २९ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होत असताना शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पहिल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपतो की काय असे वाटत होते. मात्र शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी झटपट अर्धशतक ठोकताना भारताला १८० पार धावसंख्या गाठून दिली.


हार्दिक पांड्याने ३० बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकार ठोकत ५३ धावा केल्या तर शिवम दुबेने ३४ बॉलमध्ये ७ चौकार आणि २ षटकाराच्या जोरावर ५३ धावा केल्या.


इंग्लंडला आता या सामन्यात जिंकायचे असेल तर धावा कराव्या लागल्या. याआधी राजकोटच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून २६ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर त्याआधी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ अशा आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

IND vs BAN : क्रूर पाऊस! ICC महिला विश्वचषकात भारताचा विजय हुकला; बांगलादेश पराभवापासून वाचला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट