इंग्लंडविरुद्ध भारताचा १५ धावांनी विजय, मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने १५ धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.


भारताने इंग्लंडला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडचा डाव १६६ धावांवर आटोपला. इंग्लंडचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून हर्षिित राणा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत इंग्लंडच्या संघाला खिंडार लावले.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी बोलावले. भारताने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर १८२ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले आहे.

सुरूवातीच्या फलंदाजांपैकी सलामीवीर अभिषेक शर्माने २९ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होत असताना शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पहिल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपतो की काय असे वाटत होते. मात्र शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी झटपट अर्धशतक ठोकताना भारताला १८० पार धावसंख्या गाठून दिली.


हार्दिक पांड्याने ३० बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकार ठोकत ५३ धावा केल्या तर शिवम दुबेने ३४ बॉलमध्ये ७ चौकार आणि २ षटकाराच्या जोरावर ५३ धावा केल्या.


इंग्लंडला आता या सामन्यात जिंकायचे असेल तर धावा कराव्या लागल्या. याआधी राजकोटच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून २६ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर त्याआधी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ अशा आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे