बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला

  79

पालघर : २० जानेवारीपासून बेपत्ता असलेले पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आज सापडला आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे.


२० जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती.



गेल्या १२ दिवसांपासून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीनं पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले होते.


दरम्यान अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती