Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Election) सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडल्याने आम आदमी पार्टी (आप)ला मोठा धक्का बसला आहे. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे. या निर्णयाने 'आप'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, हे या सात आमदारांच्या सोडण्याच्या निर्णयातून स्पष्ट होईल. पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात या घटनाक्रमावर विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली आहे, तर काहींनी या निर्णयाला 'आप'च्या अंतर्गत फुटीचे कारण ठरवले आहे.


पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी ईमानदारीच्या राजकारणासाठी जॉइन केली होती, पण आता पक्षात इमानदारीचे काहीच दिसत नाही. महरौलीच्या जनतेने मला सांगितले की हा पक्ष सोडायला हवा, कारण त्यांनी आमच्याशी फसवणूक केली आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात