Fire : प्रयागराजमध्ये चाललंय तरी काय? आधी आग, मग चेंगराचेंगरी आता पुन्हा आग!

महाकुंभात चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा परिसरात अग्नितांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!

१९ जानेवारीला लागलेल्या आगीत जळाले होते १८० पंडाल


प्रयागराज : महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज भीषण आग (fire) लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत.





महाकुंभ नगरीत अग्निशमन कार्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह ४ आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर्स तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ-थर्मल इमेजिंग सारख्या प्रगत प्रणाली आहेत. बहुमजली आणि उंच तंबूंमध्ये आग विझवण्यासाठी याचा वापर केला जातो. एडब्ल्यूटी ३५ मीटर उंचीपर्यंत आग विझवू शकते.





महाकुंभमेळा परिसर अग्निमुक्त करण्यासाठी, येथे ३५० हून अधिक अग्निशमन दल, २००० हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ, ५० अग्निशमन केंद्रे आणि २० अग्निशमन चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. रिंगण आणि तंबूंमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. तरीही याठिकाणी आज दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली.



उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. छतनाग घाट नागेश्वर घाटच्या सेक्टर २२ मधील आगीच्या घटनेत तंबू जळून खाक झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यात आली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.


छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्‍या जवानांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. आगीच्‍या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा परिसरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनाचा त्‍यांनी आढावा घेतला. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्‍या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.


यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू भस्मसात झाले होते. सिलेंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली होती.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला