Health: दररोज एक वाटी दही खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, डाएटमध्ये जरूर करा सामील

मुंबई: दही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात. अशातच आपल्या डाएटमध्ये दह्याचा समावेश जरूर केला पाहिजे. दही हे असे सुपरफूड आहे ज्याचे सेवन तुम्ही थंडी अथवा उन्हाळ्यातही करू शकता. थंडीत दहीचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. तर उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ल्याने शरीरास थंडावा मिळतो. दह्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीरास एनर्जी मिळते.


दही खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण हे खाल्ल्याने इतर काही खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. दही एक प्रोबायोटिक आहे जे कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असते. थंडीत हे खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.


दह्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात जे शरीरास सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात.



दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते जे हाडांसाठी अतिशय फायदेशीर असते. याचे सेवन दररोज केल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.


दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यामुळे भूक कमी होण्यास मदत मिळते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते.


दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे स्किनसाठी नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. यामुळे स्किन स्मूद, हायड्रेट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात