Mumbai Bike Taxi : मुंबईत सुरु होणार बाईक टॅक्सी,परिवहनमंत्र्यांची घोषणा!

मुंबई : राज्याला लागलेल्या प्रदूषणाची झळ कायम असताना काही दिवसांपूर्वी मुंबईत टप्प्याटप्प्याने पेट्रोल - डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करून इलेक्ट्रिक गाड्या चालू केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. अशातच आता राज्यात वाहतुकीच्या सुविधा वाढवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत उबर, ओला टॅक्सी सारख्या बाईक टॅक्सी सेवा चालू केल्या जाणार आहेत. बाइक टॅक्सीसाठी परवाने देण्याचे कामही सुरू होणार असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाईक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.



बुधवारी याबाबत अधिक माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, ओला-उबरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते. असे असले तरी बाईक टॅक्सीसाठी अनुकूल वातावरण असले तरी रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांचा याला विरोध आहे.


मात्र या योजनेने प्रवाशांना जास्त वेळ खर्चिक घालून वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि अधिक झटपट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली