Air India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार

नवी दिल्ली : इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे ऑगस्ट २०२४ पासून भारत-इस्त्रायल विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता परिस्थिती निवळल्यामुळे या विमानसेवेला पुन्हा सुरुवात करणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. त्यानुसार आगामी २ मार्चपासून तेल अवीवसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत.



यासंदर्भात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून तेल अवीव, इस्रायलला आठवड्यातून ५ उड्डाणे चालवतील. एअरलाइन या मार्गावर त्यांचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान तैनात करेल, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २३८ सीट्स असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी नॉन-स्टॉप उड्डाणे चालविली जातील.


दरम्यान इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ यांनी सांगितले की, आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली-तेल अवीव मार्गावर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि इस्रायली एअरलाइन ईआय-एआय द्वारे मुंबई ते तेलअवीव थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हंटले आहे.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या