आपले मन, आपले चिंतन

सद्गुरू वामनराव पै



निसर्गाचे नियम पाळले की जीवनांत आनंदीआनंद आहे. निसर्गाचे नियम पाळण्याकडे आपली प्रवृत्ती असली पाहिजे पण निसर्गाचे नियमच माहीत नाहीत तर ते पाळण्याचा प्रश्नच कुठे येतो? निसर्ग नियमांबद्दल आतापर्यंत कुणीही सांगितलेले नाही. धर्माचा इतिहास. संस्कृतीचा इतिहास पाहिला तर हे कुणीही सांगितलेले नाही. हे जर सांगितले गेले असते तर जगाचा इतिहास वेगळाच झाला असता. “शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्म करावे “ यात उपासना, भक्ती तर आलीच पण यात कर्मचांग आले व पुण्यही आले. यातून निष्पन्न काय होते? सुख, शांती, समाधान, यश, समृद्धी, आनंद सर्व काही तुम्हाला यातून प्राप्त होते. मी सुरुवातीलाच सांगितले, परमेश्वराचा संबंध आपल्या जीवनाशी हा असा येतो. जग सुखी व्हायला पाहिजे असेल तर निसर्गनियमाने चाला. रामायण म्हणजे काय? क्रिया आणि प्रतिक्रिया. महाभारत म्हणजे काय? क्रिया आणि प्रतिक्रिया. तुमचे जीवन काय, क्रिया आणि प्रतिक्रिया. तुम्ही अरे म्हटलेत की का रे समोरचा म्हणणार. तुम्ही हसलात तर तो हसणार. रागावलात तर तोही रागावणार. तुम्ही हात उगारलात तर तो हात उगारणार. क्रिया तशी प्रतिक्रिया होत असते म्हणून शुभ चिंतन करा. ती कंपने जगांत जाऊन पोहोचतात.


तुम्ही जरी बोलला नाहीतरी तुमच्या कंपने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. शुभ इच्छा केल्या की तुमची कंपने त्याच्यापर्यंत जावून पोहोचतात. शुभ बोललात तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. शुभ केले तर काय बघायलाच नको. असे असून माणसे हे का करत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही मालिका बघा. त्यात जे दाखवितात ते जगांत घडलेले असते. थोडेफार अतिशयोक्ती करून दाखवितात हा भाग वेगळा पण माणूस हा तसाच वागत असतो. अनिष्ट चिंतन करणे हा माणसाचा स्वभाव झालेला आहे. अनिष्ट इच्छा करणे, अनिष्ट बोलणे, आणि अनिष्ट करणे हाच माणसाचा स्वभाव झालेला आहे म्हणून ‘‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे’’पण सांगितले काय गेले? “संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ”. संसाराने काही वाईट केलेले नाही. बायका-मुलांनी काहीही केलेले नाही. जे केले ते तू केले. जे करशील ते शुभ कर. “शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्म करावे’’ ह्यात उपासना, भक्ती, आराधना, आरती सगळेच आले. हे करायचे की नाही हे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा