Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

  63

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन संपवले असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक शोषण करून प्रियकराने फसवल्याने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या आणखी एका प्रेयसीला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.




नागपूरमधील एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने खोटे सांगत आणखी एका मुलीशी संबंध ठेवले. मृत तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनी मृत तरुणीला प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसी बद्दल समजताच तिने त्याची विचारपूस केली. त्यावेळेस मृत तरुणीच्या प्रियकराने तुझ्यासोबतच लग्न करेन असा दावा केला. काही दिवसांनी मृत तरुणीला तिचा प्रियकर व त्याची प्रेयसी दोघे मिळून तिच्यावर मानसिक दबाव आणू लागले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. आत्महत्येपूर्वी मृत मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन