Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन संपवले असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक शोषण करून प्रियकराने फसवल्याने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या आणखी एका प्रेयसीला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.




नागपूरमधील एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने खोटे सांगत आणखी एका मुलीशी संबंध ठेवले. मृत तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनी मृत तरुणीला प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसी बद्दल समजताच तिने त्याची विचारपूस केली. त्यावेळेस मृत तरुणीच्या प्रियकराने तुझ्यासोबतच लग्न करेन असा दावा केला. काही दिवसांनी मृत तरुणीला तिचा प्रियकर व त्याची प्रेयसी दोघे मिळून तिच्यावर मानसिक दबाव आणू लागले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. आत्महत्येपूर्वी मृत मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली