Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन संपवले असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक शोषण करून प्रियकराने फसवल्याने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या आणखी एका प्रेयसीला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.




नागपूरमधील एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने खोटे सांगत आणखी एका मुलीशी संबंध ठेवले. मृत तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनी मृत तरुणीला प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसी बद्दल समजताच तिने त्याची विचारपूस केली. त्यावेळेस मृत तरुणीच्या प्रियकराने तुझ्यासोबतच लग्न करेन असा दावा केला. काही दिवसांनी मृत तरुणीला तिचा प्रियकर व त्याची प्रेयसी दोघे मिळून तिच्यावर मानसिक दबाव आणू लागले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. आत्महत्येपूर्वी मृत मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,