Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

  69

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन संपवले असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक शोषण करून प्रियकराने फसवल्याने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या आणखी एका प्रेयसीला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.




नागपूरमधील एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने खोटे सांगत आणखी एका मुलीशी संबंध ठेवले. मृत तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनी मृत तरुणीला प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसी बद्दल समजताच तिने त्याची विचारपूस केली. त्यावेळेस मृत तरुणीच्या प्रियकराने तुझ्यासोबतच लग्न करेन असा दावा केला. काही दिवसांनी मृत तरुणीला तिचा प्रियकर व त्याची प्रेयसी दोघे मिळून तिच्यावर मानसिक दबाव आणू लागले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. आत्महत्येपूर्वी मृत मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या