Mahakumbh 2025 : एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग; व्हिडिओ व्हायरल

प्रयागराज : उत्तर प्रदेश मधील प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जखमींच्या मदतीला धावून आलेल्या रुग्णवाहिकेला चक्क आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



१३ जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येला अमृतस्नानाला करोडो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे १ च्या दरम्यान अमृतस्नान करण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे आजचे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले असून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेला आज अचानक आग लागली.



रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान आज घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाकुंभ मेळाव्यासाठी सोडलेल्या विशेष गाडयांना रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

िववाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ