Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

प्रयागराज: प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत(Mahakumbh Stampede) ३० भक्तांचा मृत्यू झाला आहे तर ६० जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृतस्नानासाठी महाकुंभ येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयडी वैभव कृष्ण यांनी बुधवारी चेंगराचेंगरीबाबत पत्रकार परिषद घेतली.


 


अधिकाऱ्यांनी सांगितले की महाकुंभ चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना शहराच्या विविध भागांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांपैकी २५ जणांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. पाच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासाठी १९२० हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.



काय आहे अपघाताचे कारण?


डिआयजी यांनी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे कारण सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार, मौनी अमावस्येच्या ब्रम्ह मुहूर्तावेळेस लोकांची मोठी गर्दी झाली होती. मेला परिसरात गर्दीच्या दबावामुळे अखाडा मार्गावरील अनेक बॅरिकेड्स तुटले. दुसरीकडे स्नासाठी लोक बसलेले होते. यांना गर्दीने चिरडण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अॅम्ब्युलन्सच्या मदतीने ९० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी ३० भक्तांचा मृत्यू झाला. तर काही जखमींना घरी पाठवण्यात आले. अद्याप ३६ जण रुग्णालयात दाखल आहेत.

Comments
Add Comment

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह

अयोध्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी - दत्तात्रेय होसबळे

नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांमधून झालेल्या चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे.

जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या

History of Death Penalty : भारतात फाशी देण्यात आलेली एकमेव महिला कोण? सिया गोयल प्रकरणानंतर पुन्हा इतिहास चर्चेत

नवी दिल्ली : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Murder Case) मुख्य आरोपी सिया गोयलला फाशीची