Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

प्रयागराज: प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत(Mahakumbh Stampede) ३० भक्तांचा मृत्यू झाला आहे तर ६० जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृतस्नानासाठी महाकुंभ येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयडी वैभव कृष्ण यांनी बुधवारी चेंगराचेंगरीबाबत पत्रकार परिषद घेतली.


 


अधिकाऱ्यांनी सांगितले की महाकुंभ चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना शहराच्या विविध भागांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांपैकी २५ जणांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. पाच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासाठी १९२० हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.



काय आहे अपघाताचे कारण?


डिआयजी यांनी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे कारण सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार, मौनी अमावस्येच्या ब्रम्ह मुहूर्तावेळेस लोकांची मोठी गर्दी झाली होती. मेला परिसरात गर्दीच्या दबावामुळे अखाडा मार्गावरील अनेक बॅरिकेड्स तुटले. दुसरीकडे स्नासाठी लोक बसलेले होते. यांना गर्दीने चिरडण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अॅम्ब्युलन्सच्या मदतीने ९० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी ३० भक्तांचा मृत्यू झाला. तर काही जखमींना घरी पाठवण्यात आले. अद्याप ३६ जण रुग्णालयात दाखल आहेत.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान