Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

  90

प्रयागराज: प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत(Mahakumbh Stampede) ३० भक्तांचा मृत्यू झाला आहे तर ६० जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृतस्नानासाठी महाकुंभ येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयडी वैभव कृष्ण यांनी बुधवारी चेंगराचेंगरीबाबत पत्रकार परिषद घेतली.


 


अधिकाऱ्यांनी सांगितले की महाकुंभ चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना शहराच्या विविध भागांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांपैकी २५ जणांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. पाच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासाठी १९२० हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.



काय आहे अपघाताचे कारण?


डिआयजी यांनी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे कारण सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार, मौनी अमावस्येच्या ब्रम्ह मुहूर्तावेळेस लोकांची मोठी गर्दी झाली होती. मेला परिसरात गर्दीच्या दबावामुळे अखाडा मार्गावरील अनेक बॅरिकेड्स तुटले. दुसरीकडे स्नासाठी लोक बसलेले होते. यांना गर्दीने चिरडण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अॅम्ब्युलन्सच्या मदतीने ९० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी ३० भक्तांचा मृत्यू झाला. तर काही जखमींना घरी पाठवण्यात आले. अद्याप ३६ जण रुग्णालयात दाखल आहेत.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.