महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नजर ठेवून आहेत. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एका तासाच्या आत दोनवेळा उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.



या संबंधी पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. ते सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी बातचीत करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


 


भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व आरोग्य सेवांच्या मदतीचे आश्वासन दिले. योगी आदित्यनाथ यांनी नड्डा यांना सांगितले की परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा