महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नजर ठेवून आहेत. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एका तासाच्या आत दोनवेळा उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.



या संबंधी पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. ते सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी बातचीत करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


 


भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व आरोग्य सेवांच्या मदतीचे आश्वासन दिले. योगी आदित्यनाथ यांनी नड्डा यांना सांगितले की परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित

Ayodhya Ram Mandir : २५ नोव्हेंबरला राम मंदिरात भाविकांसाठी 'नो एन्ट्री'! अयोध्या सोहळ्यासाठी ८ हजार निमंत्रणे; PM मोदी उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

'मोंथा' चक्रीवादळामुळे ब्रिटीशकालीन जहाज आले किनाऱ्याजवळ!

ओडिशा: 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. या लाटांच्या जोराने एका जहाजाचा सांगाडा