ISRO 100th Mission : ‘इस्रो’ने रचला इतिहास; १०० वे मिशन यशस्वी!

जीएसएलव्ही रॉकेटसह एनव्हीएस-02 उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च


नवी दिल्ली : इस्रोने ऐतिहासिक १०० वे मिशन यशस्वी केले. या मोहिमेत इस्रोने जीएसएलव्ही रॉकेटमधून नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आणि या वर्षातील हे पहिलेच मिशन होते. (ISRO 100th Mission)



इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही रॉकेटद्वारे नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी ६.२३ वाजता करण्यात आले. २० मिनिटांत उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेले जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल त्याच्या १७ व्या उड्डाणात नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ वाहून नेला. नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ हा नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय उपखंडातील तसेच भारतीय भूमीपासून सुमारे १,५०० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रांमधील वापरकर्त्यांना अचूक स्थान, वेग आणि वेळेची माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.


१०० व्या मिशनच्या यशाबद्दल इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले की, २०२५ मध्ये इस्रोचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एनव्हीएस-२ उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या मोहिमेचे १०० वे प्रक्षेपण हा एक मैलाचा दगड आहे.


नारायणन यांनी शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ मोहिमेची आठवण केली. ते म्हणाले की, इस्रोने आतापर्यंत सहा पिढ्या प्रक्षेपण रॉकेट विकसित केली आहेत. याची पहिली पिढी सतीश धवन यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे त्याचे प्रकल्प संचालक होते. तेव्हापासून या १०० प्रक्षेपणांमध्ये इस्रोने ५४८ उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. ज्यात परदेशी उपग्रहांचाही समावेश आहे. (ISRO 100th Mission)

Comments
Add Comment

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे

Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४