मराठा आरक्षणाची नव्यानं पुन्हा सुनावणी

मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं पुन्हा सुनावणी होणार आहे. सुरुवातीपासून ही सुनावणी सुरू होणार आहे.



मुंबई उच्च न्यायालयात नव्या मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे. यानंतर याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्यानं सुनावणी घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य झाली आहे. सुनावणीसाठी नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन केले जाणार आहे. याचिकाकर्त्यांनी रजिस्ट्रारकडे याचिकेसाठी नव्याने नोंदणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



आधीच्या न्यायमूर्तींच्या समोर याचिकांची ६० टक्के सुनावणी झाली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती या पदावर आलोक आराधे या नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. यामुळे याचिकांची नव्याने आणि सुरुवातीपासून सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. ही मागणी मान्य झाली आहे. उच्च न्यायालयाने मागणी मान्य केल्यामुळे सुनावणी नव्याने सुरू होणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा न्यायालयातील खटला निकाली निघण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता